schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
हजारो शेतकरी जमल्याचा फोटो दिल्ली आंदोलनादरम्यानचा असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या फोटोत हजारो लोक रात्रीच्या अंधारात एकत्र जमल्याचे दिसत आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, कडाक्याच्या थंडीत जगाचा पोशिंदा दिल्लीत ठाण मांडुन बसला आहे, सरकारचा जाहीर निषेध.
व्हायरल फोटो दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र मुख्य प्रवाहातील माध्यमांतील बातम्यांमध्ये हा फोटो आढळून आला नाही. यानंतर आम्ही या फोटोचा गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेतला असता तीन वर्षांपूर्वीचा असल्याचे आढळून आले. हा फोटो 2018 मध्ये मुंबईत आलेल्या ‘लाँग मार्च’मधील आहे. पी. साईनाथ यांनी सुरू केलेल्या पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया वेबसाईटवर हा फोटो आढळला. त्यातील माहितीनुसार, 12 मार्च 2018 रोजी हा फोटो मुंबईतील आझाद मैदानावर जमलेल्या शेतकऱ्यांचा आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. नाशिकहून निघालेले हजारो शेतकरी, शेतमजूर 12 मार्चला पहाटे आझाद मैदानात दाखल झाले होते.
अधिक शोध घेतला असता आम्हाला एबीपी माझाची बातमी आढळून आली ज्यात म्हटले आहे की, संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, वन हक्क कायद्याची अंमलबजावणी, नद्या जोड प्रकल्पांचा प्रश्न, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृध्दापकाळ, श्रावणबाळ पेन्शन योजना, बोंडअळी व गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न, कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात, शेतकऱ्यांना विनाअट कर्जमुक्ती द्या
शेतीमालाला दीडपट हमीभाव द्या,स्वामिनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अमलबजावणी करा, वन अधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा,पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळवून राज्यातील शेती समृद्ध करा आदि मागण्यांसाठी भारतीय किसान सभेच्या वतीने नाशिक ते मुंबईतील आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. यात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. ते 12 मार्च रोजी पहाटे आझाद मैदानावर दाखल झाले होते.
यावरुन हेच सिद्ध होते की, व्हायरल फोटो हा सध्या दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा नसून तीन वर्षापूर्वी शेतक-यांनी मुंबईतील आझाद मैदानात काढलेल्या मोर्चाचा आहे.
Ruralindiaonline.- https://ruralindiaonline.org/articles/long-march-blistered-feet-unbroken-spirit/
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.
Yash Kshirsagar
January 28, 2021
Yash Kshirsagar
March 26, 2021
Yash Kshirsagar
March 30, 2021
|